बुलढाणाः शुक्रवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांसह जीवितहानीही केली. अंबिकापूर शिवारातील शेतात काम करणारा चितोडा येथील ४० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तर संग्रामपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळं घराची भिंत कोसळून दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. दुपारनंतर विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अंबिकापूर शिवारात वीज पडल्याने परिसरात काम करीत असलेला चितोडा येथील गोपाल महादेव कवळे (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह खामगावात आणण्यात आला. त्याबाबतचा अहवाल तलाठ्याने दिला आहे.

बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलं. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दोन मुली दबल्याची घटना घडली. कृष्णाली आणि राधा असे या मुलींची नावे आहेत. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला तपासून मृत घोषित केलं तर राधावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, पण काळजीचं कारण नाही; तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण
आधीच पिकांचे नुकसान

या परिसरात आधीच वादळासह पावसाने नुकसान झाले आहे. त्याबाबतचा अहवाल तलाठ्यांनी दिला आहे. पुन्हा त्याच भागात पावसाचा तडाखा बसला आहे. आता त्या ठिकाणच्या नुकसानाची पुन्हा पाहणी करता येत नाही. त्यामुळे आधीच्या अहवालानुसारच शासनस्तरावरून मदत मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दुपारी बुलढाणा, मोताळा, देऊळघाट, कोलवड, केळवद या ठिकाणी अवकाळी पावसाचे आगमन झाले. सोसाट्याचा वारा व तुरळक गारपीटही झाली. यासह चिखली, देऊळगावराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मेहकर या तालुक्यांच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्यात येणारा पाऊस बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरतो. बर्‍याच ठिकाणी गहू काढणे आटोपत आले असल तरी मका, ज्वारी, आंबा, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, भाजीपाला आदी पिके आहेत. आलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले. बर्‍याच भागात आंबा लगडलेला आहे. वादळीवारा व गारपीटही झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाल्याची परिसरात चर्चा आहे. जवळपास अर्धा तास पाऊस बुलढाणा परिसरात बरसला. दरम्यान काही प्रमाणात गारपीटही झाली.
यात्रेत सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, कारवाईदरम्यान पोलिसांवरच हल्ला
हवामान विभागाकडून राज्‍यातील काही भागात आगामी तीन– चार दिवस अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्‍यानुसार राज्‍यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून उन्‍हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेतदेखील काहीसा गारवा असल्‍याचे जाणवत आहे. उन्हाळात कडक ऊन तापले तर पावसाळा चांगला राहतो, असे संकेत असतात. उन्हाळ्यात तापले तर पावसाळ्यात बरसते असे म्हणतात. मात्र मार्च महिन्यात यंदा दोन वेळा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, अवकाळी पावसासह गारपीटचाही तडाखा बसला आहे. यंदाचा पावसाळा चांगला राहील की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहे.

पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग ‘असा’ लागला छडा

ढोल ताशाच्या गजरात चैत्र यात्रेला सुरूवात; लाखो भाविकांनी जोतिबाच्या डोंगर फुलला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here