अयोध्या: राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे प्रमुख खासदार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून पंतप्रधान यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून आपल्या पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले आहे. या मुळे भारतात आता हिंदू राष्ट्राचा पाया रचला गेला आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी व्यक्त केली आहे.

आज दिवस म्हणजे आणि लोकशाहीबरोबरच धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा दिवस आहे, असेही ओवेसी म्हणाले. आज आपण भावुक झालो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र, मी देखील तितकाच भावुक होतो कारण मी नागरिकांचा सहभाग आणि समानतेवर विश्वास ठेवतो, असे ओवेसी म्हणाले. मिस्टर पंतप्रधान, या ठिकाणी ४५० वर्षे मशीद उभी होती यासाठी देखील मी भावुक आहे, असेही ते पुढे म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजनापूर्वी केले ट्विट

राम मंदिराच्या भूमिपूजनापूर्वी ओवेसी यानी दोन फोटोंसह एक ट्विट केले. बाबरी मशीद होती, आहे आणि राहील. इंशाअल्लाह, #बाबरीजिंदाहैं. ओवेसी यांचे हे हॅशटॅग (#BabriZindaHai) ट्विटरवर ट्रेंड झाला आहे. धर्मनिरपेक्षता हे भारताच्या संविधानाचं अभिन्न अंग आहे. पंतप्रधान राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन संविधानाचा अनादर करत आहेत, असं ओवेसी यांनी म्हटले आहे.

वाचा:

‘मशिदीचे अस्तित्व संपत नाही’
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबरी मशीद होती आणि नेहमीच मशीदच राहील असे बोर्डाने म्हटले आहे. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण असल्याचे बोर्डाने नमूद केले आहे. अन्यायपूर्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्यंकांचे तुष्टीकरण करणाऱ्या निर्णयाद्वारे जमिनीवर झालेले पुनर्निर्माण हे बदलू शकणार नाही. दु:खी होण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

वाचा:

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here