मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट गेल्या काही काळापासून जणू रुसली आहे. तो खेळपट्टीवर सातत्याने धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. ही केवळ मुंबई इंडियन्सच नाही, तर टीम इंडियासाठीही चिंतेची बाब आहे. लाडक्या ‘स्काय’ला धावांसाठी ‘धावा’ करताना पाहून चाहत्यांचा जीवही तीळतीळ तुटतोय. आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात सूर्यकुमार यादव मात्र (पुन्हा एकदा) पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. सूर्याचा गेल्या सहा डावांतील हा चौथा गोल्डन डक ठरला.गोलंदाजांची चिरफाड करणारा सूर्यकुमार यादव अचानक एकेरी धावा काढण्यासाठीही धडपडू लागला आहे. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपासून झाली. तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्याच वेळी त्याच्या आवडत्या टी२० फॉरमॅटमध्येही त्याचा प्रभाव दिसून आला. आयपीएल २०२३ मध्ये, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत तीन सामन्यांत एकूण फक्त १६ धावा केल्या आहेत. दिल्लीविरुद्ध मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरल्यानंतर तो मॅचनंतर रिकी पाँटिंगशी संवाद साधताना दिसला.

रोहितने डोक्यावरच हात मारला, नो बॉल-फ्रि हीट नसताना मुंबईने एकाच चेंडूत दिल्या ११ धावा
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आणखी एका फ्लॉप इनिंगनंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना सूर्यकुमार यादव निराश झालेला दिसला. अशा परिस्थितीत तो सामना संपल्यानंतर दिल्लीचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगशी बोलताना दिसला. दोघांमधील संभाषणाचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये पाँटिंग सूर्यकुमारला काहीतरी समजावताना दिसत आहे. खराब फॉर्म असूनही पाँटिंगने अलिकडेच सूर्यकुमारची पाठराखण केली होती. पाँटिंग आणि सूर्यकुमार व्यतिरिक्त, फोटोत मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी देखील होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. रिकी पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा काही वर्षांपूर्वी फेर धरत होती. त्यामुळे हाच धागा पकडत नेटिझन्सनी सूर्याला रिकीकडून गुरुग्यान घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या आणि १९.४ षटकांत ऑल आऊट झाले. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली.

मी कधी विचारच केला नव्हता… रिंकू सिंहच्या कामगिरीनं वडिलांचं उर भरून आलं

यानंतर १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच स्फोटक झाली. पण दिल्लीच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये पकड घट्ट केला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना खूपच रंजक झाला. मुंबई इंडियन्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. मात्र, स्ट्राईकवर असलेल्या टीम डेव्हिडने आपल्या संघासाठी ते साध्य केलं आणि मुंबईने हा सामना सहा विकेट राखून जिंकला. आयपीएल २०२३ मधील मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय होता.

रोहित शर्माची भविष्यवाणी अखेर खरी ठरली, सामना सुरु होण्यापूर्वी काय म्हणाला होता पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here