यावरून प्रधान आरक्षक रंजन तेलंग व गावंडे यांनी आजीबाईचा शोध घेतला असता. त्या शेगाव प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आढळून आल्यामुळे आजीच्या मुलाला तुमची आई शेगावला असल्याचे समजताच तो मलकापूर स्टेशनवरून शेगावला पोहोचला. आईला बघून तो आनंदित झाला. यानंतर आजीला मुलाकडे सुपूर्त करण्यात आलं. फक्त २ तासांत आई भेटल्याने सदर मुलगा व आई दोन्ही आनंदी झाले.
खरंतर, प्रवास करताना आणि तेही सोबत वृद्ध व्यक्ती असताना फार काळजी घ्यावी लागते. त्यातच आपण मुख्यतः रेल्वेने प्रवास करत असतो तर अधिक काळजी घ्यावी लागते. कारण, एखादी व्यक्ती हरवली तर तिचा शोध घेणं फार अवघड होऊन बसतं. पण ज्या सूचकतेने मुलगा मोरा सत्यनारायण याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वे सुरक्षा यंत्रणेसोबत संपर्क साधत शेगावपासून फक्त २ स्टेशन पुढे असलेल्या मलकापूर रेल्वे स्टेशनवरून संपर्क साधत आपल्या आजी हरवलीची सूचना दिली.
तिचं सविस्तर वर्णन सांगितलं. रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या परिश्रमाने तो आपल्या आजीपर्यंत पोहोचलादेखील. यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावरून घटना घडल्यानंतर धांदल न उडता प्रशासनाला कसं सहकार्य करता येईल व आपण स्थिर राहून मार्ग कसा काढता येईल, हे या यावरून दिसून येतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.