सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकार काहीतरी लपवत असल्याचा भाजपचा आरोप आहे. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. त्यामुळंच मुंबई पोलीस निष्पक्षपातीपणे चौकशी करत नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे. बिहार पोलिसांच्या वतीनं मुंबईत तपासासाठी आलेल्या विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यात आल्यामुळं भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. विनय तिवारी यांना तपासासाठी क्वारंटाइनच्या नियमातून सवलत देण्यात यावी असं पत्र बिहार पोलिसांनी मुंबई महापालिकेला (BMC) लिहिलं होतं. त्यावर उत्तर देताना तिवारी यांनी तपासासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असा सल्ला महापालिकेनं बिहार पोलिसांना दिला आहे. त्यावरून भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे.
वाचा:
‘राज्य सरकार व मुंबई महापालिकेचा संपूर्ण कारभार व्हर्च्युअली सुरू असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे. ‘व्हर्च्युअल राज्य सरकार व व्हर्च्युअल मुंबई पालिकेने जसे रस्त्यावरील खड्डे व्हर्च्युअली भरले, नाल्यातील गाळ व्हर्च्युअली काढला. त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास क्वारंटाइन विनय तिवारी यांनी व्हर्च्युअलीच करावा, अशी अपेक्षा आहे का? घरात बसून मोबाइल गेम खेळणाऱ्यांनी तर हा सल्ला दिला नाही ना,’ अशी खोचक टोलाही शेलार यांनी हाणला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.