विरार:राज्यभरात शुक्रवारी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. अनेक भागांमध्ये मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला या उत्सवाला गालबोट लावणारी एक घटना घडली होती. विरारच्या कारगिलनगरमध्ये गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यामध्ये दोन भीमसैनिकांचा मृत्यू झाला होता. या भागातील बुध्दजन पंचायत समितीतर्फे आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक संपवून रात्री साधारण साडेदहाच्या सुमारास सर्व भीमसैनिक आपापल्या घरी निघाले होते. या मिरवणुकीत बँजो वाजवण्यासाठी एक ट्रॉली तयार करण्यात आली होती. मिरवणूक संपल्यानंतर भीमसैनिक ही ट्रॉली ओढून माघारी नेत होते. सगळेजण रमतगमत, हसतखेळत आणि गप्पा मारत रस्त्यावरुन ट्रॉली ओढत होते. या ट्रॉलीवर सपोर्टसाठी एक लोखंडी रॉड लावण्यात आला होता.

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत अनर्थ, ट्रॉलीचा लोखंडी रॉड रोहित्राला चिकटला; वीजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

ही ट्रॉली ज्या मार्गावरुन जात होती, त्या रस्त्यावर वीजपुरवठ्यासाठी वापरले जाणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) होते. ट्रॉली खेचणाऱ्या लोकांना याचे भान राहिले नाही. त्यामुळे ट्रॉलीवरचा लोखंडी रॉड या रोहित्राला चिकटला. त्यामुळे रोहित्रातील उच्च दाबाचा वीजपुरवठा लोखंडी रॉडमधून संपूर्ण ट्रॉलीत पसरला. त्यामुळे ट्रॉली खेचत असलेल्या लोकांना वीजेचा जोरदार झटका बसला. उच्च दाबाचा विद्युतप्रवाह ट्रॉली धरून उभ्या असलेल्या दोघांच्या अंगात शिरला. त्यामुळे काहीवेळासाठी दोघांच्या शरीराला अक्षरश: आग लागली. यामध्ये हे दोघेजण पूर्णपणे होरपळले आणि खाली पडले. ट्रॉलीवरच्या लाकडी बांबूंना धरून असणाऱ्यांना मात्र वीजेचा झटका बसला नाही. ट्रॉलीवरच्या लोखंडी भागाला धरून असणाऱ्या इतर काहीजणांनाही शॉक बसला.

भयंकर! साखळी, चाबूक, विजेचा शॉक; बेदम मारहाणीत ट्रान्सपोर्ट मॅनेजरचा अंत; मालकानं जीव घेतला

हा सगळा प्रकार अवघ्या काही सेकदांमध्ये घडला. शॉक लागल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या लोकांनी शॉक लागलेल्यांना खेचून बाजूला काढले. मात्र, या दुर्घटनेत रुपेश सुर्वे (वय ३० वर्ष) आणि सुमित सुत (वय २३ वर्ष) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. त्यापैकी उमेश कनोजिया (वय १८ वर्ष) राहुल जगताप (वय १८ वर्ष), सत्यनारायण (वय २३ वर्ष) या तिघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईच्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत. तर अस्मित कांबळे या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच कारगिल नगर परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच भीमसैनिकांनी आणि स्थानिकांनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रुग्णालयात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here