कोलकाता:आयपीएल २०२३ मधील पहिले झंझावाती शतक हॅरी ब्रुकच्या बॅटमधून झळकले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हहैदराबादने २३ धावांनी कोलकाताच्या संघाचा पराभव केला. या सामन्यात १३.२५ कोटींच्या हॅरी ब्रूकने हैदराबादसाठी जोरदार फलंदाजी केली. ३ सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर त्याने KKR विरुद्धच्या चौथ्या सामन्यात जबरदस्त शतक झळकावले. त्याच्या दमदार शतकाने एकच धुमाकूळ घातला. त्याचे हे शतक आयपीएल २०२३ मधील पहिले शतक ठरले. या खेळीनंतर त्याने भारतीय चाहत्यांबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली.ब्रुकच्या या अतुलनीय खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यांनतर तो भारतीय चाहत्यांबद्दल त्याने वक्तव्य केले. सलग ३ सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर हॅरी ब्रूकवर जोरदार टीका झाली. कारण लिलावादरम्यान त्याला ज्या किंमतीत विकत घेण्यात आले ती मोठी रक्कम होती. अशा परिस्थितीत, फ्लॉप झाल्यानंतर चाहत्यांनी हॅरीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र शतक झळकावल्यानंतर ब्रूकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय चाहत्यांबद्दल काय म्हणाला…
सामन्यानंतर तो भारतीय चाहत्यांबद्दल म्हणाला, ‘तुम्ही सोशल मीडियावर जाता आणि लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात. आज माझे अनेक भारतीय चाहते आहेत जे माझे कौतुक करतील. पण काही दिवसांपूर्वी ते माझ्यावर टीका करत होते. मी त्यांची बोलती बंद करू शकलो याचा मला आनंद झाला.”
भारतीय चाहत्यांबद्दल काय म्हणाला…
सामन्यानंतर तो भारतीय चाहत्यांबद्दल म्हणाला, ‘तुम्ही सोशल मीडियावर जाता आणि लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात. आज माझे अनेक भारतीय चाहते आहेत जे माझे कौतुक करतील. पण काही दिवसांपूर्वी ते माझ्यावर टीका करत होते. मी त्यांची बोलती बंद करू शकलो याचा मला आनंद झाला.”
राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
सामन्याचा लेखा जोखा
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २२८ धावा केल्या. त्यांनी केकेआरला २२९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले ज्यामध्ये हॅरी ब्रूकचे शतक आणि एडन मार्करामच्या अर्धशतकाने महत्त्वाची भूमिका बजावली. २२८ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ७ विकेट्स गमावत २०५ धावाच करता आल्या आणि सामना २३ धावांनी गमावला. नितीश राणाने ७५आणि रिंकू सिंगने नाबाद ५८ धावांची शानदार खेळी केली.