मुंबई/पुणे :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही बस निघाली होती, यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.मुंबईतील गोरेगावचे बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्याला गेले होते. कार्यक्रम संपवून ते मुंबईला परत येत होते. या पथकातले दोघे जण खोपोलीत राहत होते. त्यांना सोडण्यासाठी बस जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डावीकडे वळली. त्याचवेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. ते दोघेही जण सुरक्षित आहेत.
दरम्यान, अपघातानंतर अत्यवस्थ असलेल्या जखमींना पोलिसांनी खांद्यावरुन वरती नेलं. मला आधी वर न्या, माझा जीव वाचवा, अशी याचना जखमी करत होते. काही जण पिण्यासाठी पाणी मागत होते, मात्र त्यांना जखमा झाल्याने तातडीने पाणी देणं टाळण्यात आलं.
दरम्यान, अपघातानंतर अत्यवस्थ असलेल्या जखमींना पोलिसांनी खांद्यावरुन वरती नेलं. मला आधी वर न्या, माझा जीव वाचवा, अशी याचना जखमी करत होते. काही जण पिण्यासाठी पाणी मागत होते, मात्र त्यांना जखमा झाल्याने तातडीने पाणी देणं टाळण्यात आलं.
जुन्या पुणे मुंबई हायवेवर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये ही बस दरीमध्ये कोसळली होती. यावेळी ४० ते ४५ जण प्रवास करत होते. यामधील १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. छत उचकटले गेल्याने सीट बाहेर आल्या. तर टपावर ठेवलेले ढोल-ताशेही विखुरले होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
मदतकार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. स्पॅाटवर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली. तर खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते.