रियाला द्यावे लागतील बिहार पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं-
सुशांतच्या केसमध्ये सर्वात मोठी घडामोड ही आहे की केंद्राने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रियाच्या वकिलांकडून सादर केलेल्या अंतरिम संरक्षणाची विनंती नाकारली आहे. न्यायालयाने सांगितले की, प्रतिभावान अभिनेत्याचा असामान्यरित्या मृत्यू झाला आहे. सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे. आता बिहार पोलीस रियाची चौकशी करेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याला क्वारन्टीन करून जनतेसमोर चांगला संदेश ठेवला नाही. महाराष्ट्र सरकारलाही न्यायालयाने यासंबंधी प्रश्न विचारले.
सुशांतच्या वडिलांनी दाखल केली होती एफआयआर
सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. यात त्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (
) रिया चक्रवर्तीला समन्स पाठवला आहे. सुशांतची केस मनी लॉण्डिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे. ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. असं म्हटलं जातं की ईडीची मुंबई ब्रान्च रियाची तीन भागांमध्ये चौकशी करणार आहे. यातील पहिल्या भागात तिला खासगी प्रश्न विचारण्यात येतील. यात रियाच्या वडिलांचं नाव काय, घरचा पत्ता काय आणि कुटुंबात किती व्यक्ती आहेत असे प्रश्न विचारण्यात येतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.