दरम्यान, एकीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक भागांमध्ये उष्णाचा तडाखा बसणार आहे. महाराष्ट्रात तर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीत दिवसाचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यभरामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा आता हवामान खात्याने अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाकडून धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून मराठवाड्यातील लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News