Police Bharti Youth Dies During Test : राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गरापीट होत आहे तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताची दुर्घटना ताजी असताना असताना अशा कडक उन्हात पोलीस भरती होत आहे. या एका तरुणाचा चाचणी दरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वी २८ मार्च रोजी अहमदनगरच्या विकास काळे या तरुणाचा धावताना कोसळून मृत्यू झाला. १७ फेब्रुवारीला गणेश उगले हा वाशिमचा उमेदवार मैदानी चाचणी दरम्यान दगावला. तर अमरावतीच्या अशोक सोलंकी याचे मैदानी चाचणीनंतर हॉटेलमध्ये परतल्यानंतर निधन झाले. वाढती उष्णता, उमेदवारांकडून होणारी निष्काळजी, प्रकृतीबाबत लपवाछपवी ही मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचे म्हटले जाते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.