‘देशात सर्वात भ्रष्ट पालिका म्हणून महापालिकेचा उल्लेख होतो. विरोधी पक्षनेता असतानाही मी हा आरोप केला आहे. ही महापालिका म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था आहे,’ असा घणाघात माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ‘मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतले आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ( attacks and Shivsena)
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने विळदघाट येथे कै. श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आयएमए चे अध्यक्ष अनिल आठरे, डॉ. अभिजित दिवटे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला सुरू असलेल्या पावसाने मुंबईसह येथील उपनगरांची जी बिकट अवस्था झाली आहे, याबाबत भाष्य करताना प्रशासनासह शिवसेनेवर सडकून टीका केली.
‘मुंबईची महापालिका म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था आहे. त्याच नाल्यातील गाळ काढायचा, त्याची बिले करायची व पुन्हा त्याच नाल्यात तो गाळ जातो, अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. मला वाटते आता याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर राजकारण सुरू केले जाईल,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
‘आज मुंबईची जी दुर्दशा झाली आहे, पाणी जाण्यास जागा नाही, पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे हाल होतात. याला संपूर्णतः मुंबई महापालिका व ज्यांच्या अधिपत्याखाली गेली पंचवीस वर्षे ही महापालिका कार्यरत आहे ती शिवसेना जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.