नवी दिल्ली: भारतीय बँकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या पुनविचार याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय यासाठी घ्यावा लागला की या खटल्यासंदर्भातील फाइलमधील काही कागदपत्रे गायब झाली आहेत.

वाचा-
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणीचा हा खटला आहे. मल्ल्याला २०१७ साली सर्वोच्च केल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन स्वत:ची संपत्ती कुटुंबाच्या नावावर केली होती.

वाचा-
या खटल्यासंदर्भातील संदर्भातील एक कागदपत्र मिळत नाही. यामुळे गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. मल्ल्याने तीन वर्षापूर्वी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ज्याची तारीख आज आली.

वाचा-
मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी मल्ल्याने याचिका दाखल केली होती.

वाचा-

कोर्टाने नाराजी व्यक्त केली
विजय मल्ल्याची याचिका उशिराने लिस्ट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ साळी दिलेल्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आता सुनावणीस आली होती. ही याचिका आतापर्यंत का न्यायालयासमोर आली नव्हती अशी विचारणा रजिस्ट्रीकडे करण्यात आली होती. तसेच यावर दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते.

हे देखील वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here