कर्नल सुरेश पाटील यांनी या भंगारातील बसचं रुपडं असं बदलवले आहे की पहिल्या नजरेत ही बस आहे की एखाद टुमदार घर हे लक्षात येणं देखील अवघड आहे. ही बस कर्नल सुरेश पाटील यांनी अगदी कमी पैशात खरेदी केली आणि ते राहत असलेल्या घोरपडी भागातील घराच्या अंगणात ठेवली. बस मधील शीट आणि इंजिन हे विकून टाकले आणि त्याच पैशातून या भंगारातील बसचे एका टुमदार घरात रूपांतर केलं. शेतकऱ्यांना रात्री उशिरा शेतात निवारा भेटावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता
या बसमधील केबिनमध्ये शहाबादी फरशी बसवत बसमधील केबिनमध्ये त्यांनी स्वच्छतागृह बनवलं. बसच्या छतावर पाण्याची एक टाकी ठेवली. तेच पाणी स्वच्छतागृहात वापरले. तर तिथून निघणाऱ्या सांडपाण्यावर त्यांनी घरासमोर एक सुंदर बाग फुलवली आहे. तर केबिनच्या मागच्या भागात एक लाकडी प्रशस्त बेड आहे. गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी टेबल फॅन देखील आहे. इतकंच काय तर वाचन करण्यासाठी बेडच्या जवळच एक मोठं बुकशेल देखील बनवलं आहे.
भंगारात निघालेली बस शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोकळ्या जागेवर ठेवावी आणि त्यातून अशापद्धतीने आपल्यासाठी निवारा कसा करावा याच उत्तम उदाहरण कर्नल सुरेश पाटील यांनी दाखवून दिल आहे. याबद्दल अधिक बोलताना सुरेश पाटील म्हणतात, ‘दरवर्षी भंगारात लाखो बस आपल्याकडे लिलावात काढल्या जातात. पर्यावरण रक्षणासाठी टाकाऊ पासून टिकाऊ करणं गरजेचं असतंच आणि यामुळे शेतकऱ्यांना देखील शेतात निवाऱ्यासाठी घर बांधण्याची गरजच नाही. या बसचे घर बनवताना विजेसाठी सोलर पॅनलचा देखील वापर करू शकतो.
या पार्यायामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने रक्षण होऊ शकते. रात्री वीज आल्यावर त्याला शेतात गेल्याशिवाय पर्याय नसतोच. शेतात पाणी सुरु केल्यानंतर शेतकरी रानात कुठेही बसतो त्यामुळे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. पण हा पर्याय जर त्याने वापरला तर त्याच्या जीवाला धोका तर होणारच नाही पण एक निवारा देखील चांगला होऊ शकेल. कर्नल सुरेश पाटील यांच्या या जुगाडाची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. आणि शेतकऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद याला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
काळ्या पाठीचे खेकडे अन् गावरान कोंबडी; ग्राहकांना अस्सल जेवू घालण्यासाठी पठ्ठ्याचा भन्नाट व्यवसाय