वाचाः
‘सुशांतसिंग प्रकरणाच्या तपासात प्रदिर्घ काळ गेला आहे. त्यामुळे आरोपीला कुठे जाण्यास वेळ मिळाला असेल तर, ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्यावरच जबाबदारी येणार,’ असेही विखेंनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्यानंतर काय वास्तविकता आहे, ती समोर येईल, याची खात्री आहे. जी काही सत्य परिस्थिती आहे, ती बाहेर येईल. मात्र आज संबंधित अभिनेत्रीचा फक्त वकिल बोलतोय. त्या कुठे दिसत नाही. त्यामुळे त्या खरचं इथे आहेत का? यामध्ये किती मोठे षडयंत्र असू शकते? हे सीबीआयच्या माध्यमातून जनतेसमोर येईल,’ असेही विखे म्हणाले.
वाचाः
दरम्यान, सुशांतसिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार येथून आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले. यावर देखील विखे यांनी भाष्य करताना राज्य सरकारवर टीका केली. ‘आयपीएस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. मग तो कोणत्याही राज्याचा अधिकारी असो. आजही लोक सर्रास मुंबईला जाऊन परत येतात. त्यांना कोणी विचारत नाही, त्यांना कोणी पाहायला नाही. कुठेही क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा नाही. पण त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यासाठी जागा केली. मुळात यापूर्वी आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केले नाही, पण आयपीएस अधिकाऱ्याला केले, याचे कारण काय, याचे उत्तर येणाऱ्या काळात जनतेला द्यावे लागेल,’ असेही विखे यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.