म. टा. प्रतिनिधी, ठाणे :जेएनपीटी बंदरातून गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारा मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीकामासाठी बंद करण्यात आला असून साकेत आणि खारेगांव पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांमुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्याने गुरुवारी दिवसभर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. मुंब्रा बायपास रस्त्यावरील अवजड वाहनांनी ठाणे शहरात प्रवेश केल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई नाशिक दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने अवजड वाहनांच्या मागे अडकून पडल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.ठाणे, रायगडमध्ये भट्टी पेटली, महामुंबई परिसरात उष्णतेची लाट कायम; कर्जत, मुरबाड तापले
अवजड वाहने आणि मालवाहतूक शहराबाहेरून करण्याच्या दृष्टीने मुंब्रा बायपास सोयीचा रस्ता असला तरी हा रस्ता सातत्याने नादुरुस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कल्याण-भिवंडीमार्गे वळवण्यात आली आहे. तर अनेक वाहने नवी मुंबईतून पूर्व द्रुतगती महामार्गावरून नाशिक आणि गुजरात दिशेकडे जात आहेत. शिवाय नाशिकडून नवी मुंबईच्या दिशने येणारी वाहनेही मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे ठाणे शहरातून नवी मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगांव पुलाच्याही दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे ही वाहतूकही अरुंद पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी वाहतूककोंडी झाली. उन्हाचा त्रास आणि कोंडीचा मनस्ताप यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कोंडी कायम असल्यामुळे कामावर जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठीही त्रास सहन करावा लागत होता.

ठाण्यात ७६ गुंतवणकदारांची दीड कोटींची फसवणूक उघड; कंपनीच्या मालकासह तिघांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here