मुंबई :भारतीय व्यवसाय क्षेत्रातील आणखी एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये कंपनी आणि तिच्या मालकी हक्कांबाबत वाद सुरू झाला आहे. पण यंदा भाऊ-भाऊ नव्हे तर भाऊ आणि बहिणीचा वाद आहे, ज्यात आईच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ तिचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा बाहीने आरोप केला आहे. हे प्रकरण भारत फोर्जचे सीएमडी बाबा कल्याणी आणि त्यांची बहीण सुगंधा हिरेमठ, ३५०० कोटी रुपयांच्या (मार्केट कॅप) समूहातील वादाबद्दल आहे. सुगंधाने आरोप केला की तिचा भाऊ बाबा कल्याणी तिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर मिळायला हवा होता तो हिस्सा देत नाहीये आणि त्यांचा हक्क हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, कल्याणी यांनी बहिणीचे आरोप फेटाळले असले तरी हा वाद आता लगेच मिटताना दिसत नसताना आता या संपूर्ण प्रकरणाबाबत सुगंधाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मोठी बातमी! राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक, ११ क्षेत्रांत गुंतवणूक करणार
बाबा कल्याणी आणि सुगंधा हिरेमठ यांच्यातील वाद काय?
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ नंतर दोघं भाऊ-बहिणीच्या सुरू झाला. बाबा कल्याणी आणि सुगंधा हिरेमठ यांच्या आईचे २५ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले. अशा स्थितीत आईच्या मृत्यूनंतर १९९४ मध्ये झालेल्या करारानुसार कल्याणीने संपूर्ण हिस्सा तिच्याकडे हस्तांतरित करायला हवा होता. पण त्याऐवजी ते आपला हिस्सा वाढून त्यांना आणि त्यांच्या पतीला हिकल कंपनीतून हाकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सुगंध यांनी आरोप केला. दरम्यान, बाजारात उपलब्ध माहितीनुसार हिकलचे मार्केट कॅप ३५०० कोटी रुपये आहे.

कुटुंबातील भांडणांने घात केला; १४ अब्ज डॉलरच्या व्यवसायाची विभागणी होणार!
हिकालमध्ये कोणाचा किती हिस्सा?
सुगंधा हिरेमठ यांची हिकालमध्ये ३५% तर बाबा कल्याणी यांची ३४% भागीदारी आहे. सुगंधा यांनी म्हटले की आईच्या मृत्यूनंतर बाबा कल्याणी कंपनीचे अतिरिक्त ५८ लाख शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून या अंतर्गत बाबा कल्याणीला १५८ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. अशा स्थितीत तिचा भाऊ बाबा कल्याणी तिला कंपनीतून बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ७१ वर्षीय सुगंधाने केला.

ताजमहाल हॉटेलमध्ये करार झाला
ईटीच्या रिपोर्टनुसार, १९ जून १९९४ रोजी मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर करार झाला होता. याअंतर्गत ‘हिकाल’चे शेअर्स हिरेमठ यांना हस्तांतरित केले जाणार होते, असा दावा सुगंधा यांनी केला. हिकालचे संस्थापक जयदेव हिरेमठ, त्यांची आई, भाऊ कल्याणी आणि ICICI बँकेचे तत्कालीन अध्यक्ष एन. वाघुल आणि सेबीचे माजी अध्यक्ष एस.एस. नाडकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी आहेत. मात्र, बाबा कल्याणी सुगंधाचे आरोप फेटाळत आहेत. अशा स्थितीत प्रकरण न्यायालयात पोहोचले असून आता हा वाद कोणत्या दिशेने वळतो हे पाहावे लागेल.

ब्रिटनमधील ४ पैकी ३ श्रीमंत भारतीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here