पुणे :महाराष्ट्रानं स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना संधी देत देशापुढं आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळं राजकारणातील महिलांची संख्या वाढली आहे. अनेक महिलांनी राजकारणात विविध पदांवर काम करताना ठसा उमटवला आहे. गावपातळीवर देखील अनेक महिलांनी सरपंच म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामपंचायतीचा सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार बहीण-भाऊ बघणार आहेत. भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक भुकूम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत काढण्यात आली. भूकूम गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले असल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची अगोदरच निवड झाली होती.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुण्यात लागले अजित पवारांचे बॅनर, राष्ट्रवादी आणि घड्याळ गायब!

या अगोदरच्या सरपंच गौरी प्रसाद भरतवंश यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिकामे झाले होते. भुकूम गावच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. गावचा कारभार महिलेच्या हाती आल्याने याचा गावच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

नागपूरमध्ये थरार; डीजे वाजवण्यावरून होता जुना वाद, तीन तरुणांनी केला हल्ला, तरुण गंभीर जखमी

युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहेत. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे.यावेळी तलाठी नामदेव पासलकर ग्रामसेवक भागवत यादव,उपसरपंच अंकुश खाटपे , ग्रामपंचायत सदस्य सचिन हगवणे,सचिन आंग्रे, निलेश ननावरे, गौरी प्रसाद भरतवंश,रेखा योगेश वाघ, सुवर्णा रामदास आंग्रे, सुवर्णा सुभाष पानसरे, यावेळी पोलिस पाटील सतीश गुजर, माऊली आंग्रे, दिलीप चोरघे, योगेश वाघ, शरद पवार, पांडूरंग मराठे, नितीन कुडले, राजेंद्र आंग्रे,पोलीस कर्मचारी अनिता रवळेकर,निवास जगदाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अग्निवीर प्रशिक्षणावेळी जवानाचा उष्माघाताने बळी, धुळ्याच्या २१ वर्षीय तरुणाचा नाशकात अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here