अकोला :तुरीच्या दरात अजूनही चढ-उतार कायम आहे. आज मंगळवारी (२५ एप्रिल) विदर्भातील अकोला जिल्ह्यातल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं या बाजारात कमीत कमी ५ हजार २०० रूपयांपासून ते ८ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला. २० एप्रिल रोजी इथे तुरीला ६ हजार पासून ८ हजार ९०५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे दर होते. त्यानंतर तुरीच्या दारात सातत्यानं घसरण झाल्याचं चित्र आहे. सद्यस्थितीत बाजारात तुरीला चांगली मागणी असून आवक मात्र कमी आहे.

तुरीच्या भावात तेजी आली असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल महिन्यातील मागील काही आठवड्यातील पहिला दिवस अन् त्यादिवशी असलेले दर पुढील प्रमाणे आहेत. सुरुवातीला ३ एप्रिल म्हणजे सोमवार रोजी तुरीचे घसरले होते. या दिवशी ७ हजार पासून ८ हजार ४५० रूपये तर सरासरी भाव ८ हजार इतका होता. त्यानंतर दुसरा आठवड्यात तुरीच्या दरात वाढती दिसून आली. १० एप्रिल (सोमवार) रोजी ७ हजार पासून ८ हजार ६३० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला तर सरासरी भाव ८ हजार रूपये होता. सोमवारी (१७ एप्रिल) रोजी ६ हजार पासून ८ हजार ८०० रूपयेप्रमाणे तुरीला दर मिळाले. मात्र या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी तुरीचे दर उतरले.

बी.एस्सी अ‍ॅग्री सूनबाईचं मार्गदर्शन,सासऱ्यांनी अनुभव पणाला लावला,चिया शेतीचा भन्नाट प्रयोग अन् लाखोंची कमाई

सोमवारी ६ हजार २०० रूपये ते ८ हजार ७०० रूपयांपर्यत क्विंटलमागे तुरीला भाव मिळाला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी तुरीच्या दरात क्विंटल मागे १५० रुपयांनी भाव वाढले आहे. त्यामुळ तुरीला सरासरी भाव ८ हजार रूपये इतका होता तर कमीत कमी ५ हजार २०० ते ८ हजार ८५० प्रति क्विंटलप्रमाणे तुरीला भाव होता.

पांढऱ्या सोन्याच्या दराबाबत विदर्भाच्या कापूस पंढरीतून नवी अपडेट, शेतकरी वेगळा निर्णय घेणार, कारण…

शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा असल्यानं अनेक शतकऱ्यांनी अद्यापपर्यत तुरीची विक्री केली नाही. मात्र सद्यस्थितीत बाजारात भाव वाढले असले तरी तुरीची आवक कमीच आहे. म्हणजेच शेतकरी तूर बाजारात विक्रीसाठी कमी आणत आहेत.

चंद्रपूरच्या लेकीची भन्नाट संकल्पना,मोहफुलांपासून केक,चिक्कीची निर्मिती,महिलांच्या आर्थिक सक्षीमकरणाचं पाऊल

एप्रिल महिन्यात तुमच्या दर स्थिर राहणार असल्याची शक्यता असून ‘मे’ महिन्यात तुरीच्या दरात तेजी येणार असल्याचं संकेत आहेत. म्हणून काही शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढण्याच्या अपेक्षेने तुरीची विक्री थांबवली आहे. दरम्यान सद्यस्थितीत मिळत असलेल्या तुरीला भाव पांढर सोनं म्हणजेचं कापसाच्या तुलनेत जादा आहे.

२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here