navi mumbai crime news, वाशी रेल्वे स्थानकालगत आढळलेल्या मृतदेहाचे अखेर गूढ उकलले, पोलिसांनी तीन दिवसात लावला छडा – man found dead on railway track in navi mumbai police arrest 2 man
नवी मुंबईःनवी मुंबई मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी रात्री घडलेल्या जितेश बनसोडे (२३) या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. जितेशची हत्या त्याच्या दोघा सहकाऱ्यांनीच जुन्या भांडणाच्या रागातून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार, पोलिसांनी ऐरोलीतून सागर खरटमल (२६) व त्याचा १७ वर्षीय अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक केली आहे.सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा खून झाले असल्याचे समजले होते. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास वाशी सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान एक अनोळखी मृत्यदेह आढळून आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल झाली असून यात एका युवकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. लालबाग हत्याकांड; पत्नीमुळं घेतला टोकाचा निर्णय, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळं गूढ उकललं
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अंदाजे पस्तिशीच्या व्यक्तीचा मृतदेह वाशी सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले असून त्याचे नाव जितेश बनसोडे वय २३ असे समोर आले. जितेश हा ऐरोली सेक्टर ३ येथे राहत होता व व्यवसायाने रिक्षा चालक होता. त्याच्या हत्येचा तपास करीत असताना त्याचे आणि याच परिसरात राहणाऱ्या सागर खरटमोल (वय २६) यांचे वाद झाल्याचे समोर आले.
भटक्या कुत्र्यांना काठीने घाबरवणे व हुसकावणे ही क्रूरता; उच्च न्यायालयाचे निरीक्षण मयत व्यक्ती आणि सागर यांचे दोन महिन्यांपूर्वी हाणामारी झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. याच्या आधारे सागर याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यातील अन्य साथीदार अल्पवयीन आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली. मयत व्यक्ती आरोपीच्या बहिणीस त्रास देत होता. यातून अनेकदा वादही झाले होते. याच रागातून हत्या झाल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कांदळवनाच्या संरक्षणासाठी निसर्गप्रेमी सरसावले; आतापर्यंत जवळपास १ लाख किलो कचरा साफ