मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे आणि प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झाले.

पाहता पाहता बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. खाजगी बस अहमदाबादहून हैदराबादच्या दिशेने जात होती. बसला आग लागली, त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी आणि ३ चालक (सहाय्यकांसह) प्रवास करत होते. मात्र वेळीच ते बसमधून बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने बसला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या भीषण आगीत बससह बसमधील प्रवाशांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.