Bhiwandi Building Collapse: भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग अचानक कोसळून शनिवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये लहानगीसह तिघांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्यामधून रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

इमारतीचा भाग कोसळल्यानंतर सोनाली यांनी उशालाच असलेल्या मोबाइलवरून परमेश्वर यांना फोन केला. त्यांनी तिला हिंमत दिली. त्यानुसार सोनाली यांनी मुलाला घेऊन इमारतीच्या ढिगाऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे त्यांचे पतीशी फोनवर बोलणे सुरूच होते. सोनाली यांनी माती बाजूला केली, लाद्या फोडल्या व अत्यंत छोट्याशा जागेतून मोठ्या जिकरीने त्या मुलाला घेऊन बाहेर पडल्या. या बिकट प्रसंगाची माहिती देताना त्यांना गहिवरून आले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.