( सूर्यकांत आसबे ) : सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये मोठ्या तीन मगरीचे दर्शन झाल्यामुळे पशुपालक आणि नागरिकांची झोप उडाली आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या मगरींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

साधारण सहा महिन्यांपूर्वी कोयना नगर येथील याच घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये एका शेतमजुराचा दिसली होती. मगर पकडण्यासाठी त्यावेळी वनविभागाने त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला होता . शिवाय वासामुळे मगर काठावर येईल म्हणून वनविभागाने सोललेली कोंबडीसुद्धा बांधली होती. आठवडाभरानंतरसुद्धा त्याठिकाणी कॅमेऱ्यात काहीच न दिसल्याने अखेर वनविभागाने मगरीचा शोध थांबवला होता. आता पुन्हा कोयना नगरपासून साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव परिसरातील याच ओढ्यामध्ये नागरिकांना एक नव्हे तर तब्बल तीन मगर दिसल्यानंतर तिचे फोटो काढून या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी वन विभागाला दाखविल्यानंतर आता पुन्हा दिसलेल्या या मगरीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

हनुमंत डोके या नागरिकाच्या सांगण्यानुसार याठिकाणी एकूण तीन मगरी आहेत. त्यातील दोन मगर नुकत्याच दिसल्या असून आणखी तिसरी एक मगर याच ठिकाणी वावरत आहे. सुरुवातीला पाण्यात सर्प असेल या अनुषंगाने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकाने त्याला दगड मारला असता तो सर्प नसून मगर असल्याचे दिसताच त्याने तेथून धूम ठोकली. डोळ्याने पाहिलेली घटना त्याने गावात येऊन अन्य लोकांना व लोकप्रतिनिधींना सांगितली. बघता बघता गावात मगरींची बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरे कि खोटे यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र लक्ष ठेऊन काहीजणांनी मगरीचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. आणि मग नागरिकांना भलीमोठी मगर पाहून घाम फुटला. आता देगाव येथील मगरींचे दर्शन झालेल्या ठिकाणी वनविभागाकडून कॅमेरे आणि पिंजरा लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सोलापूरचे वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे यांनी सोलापुरात मगर पकडण्यासाठी ट्रॅप नाही तर ट्रान्सपोर्टेशन पिंजरा असून सांगली येथून ट्रॅपची मागणी केली असता सांगली परिसरात पूर आला आहे,पुराच्या पाण्यातून प्राणी बाहेर येतात त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी आपल्याकडे एकच ट्रॅप असल्याचे सांगत सांगली वन विभागाने दुसरीकडे बोट दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या प्रभागात मगरी दिसल्या आहेत त्या प्रभागाचे शिवसेनेचव नगरसेवक गणेश वानकर यांनी तत्काळ मंत्री आदित्य ठाकरे यांना संपर्क करून पत्रव्यवहार करत मगरी पकडण्यासाठी ट्रॅप आणि अत्याधुनिक पिंजरे देण्याची मागणी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here