जागतिक बँकेकडून पाकला झटका
या पूर्वी जागतिक बँकेने (World Bank) पाकिस्तानला (Pakistan) मोठा झटका देत भारतासोबत (India) अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जल विवादामध्ये मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी दोन्ही देशांनी एखाद्या तटस्थ विशेषज्ञ किंवा मग न्यायालयीन मध्यस्थीची नियुक्ती करण्यावर विचार केला पाहिजे, असे जागतिक बँकेने सूचवले आहे. या वादामध्ये आम्ही काही करू शकत नाही, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने केले हात वर
पाकिस्तानातील इस्लामाबादमधील आपला ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर जागतिक बँकेचे पाकिस्तानातील प्रकरणाची जबाबदारी अशलेले माजी संचालक पेटचमुथु इलंगोवन यांनी म्हटले की, हा विवाद सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या दोन जल विद्युत परियोजनांबाबत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनच्या (COA) नियुक्तीसाठी जागतिक बँकेला विनंती केली होती.
पाहा
वाचा:
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांच्यात १९ सप्टेंबर १९६० रोजी कराचीमध्ये सिंधू जल करार झाला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पाण्याची योग्य विभागणी व्हावी या उद्देशाने सिंधू जल करार करण्यात आला होता. या करारात व्यास, रावी, सतलज, सिंधु, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा समावेश आहे. पाण्याची विभागणी आणि वापर कसा करण्याचा याबाबतच्या अधिकारांची चर्चा या करारामध्ये करण्यात आली आहे. या करारासाठी विश्व बॅंकेने मध्यस्थी केली होती.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.