म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : डबल इंजिन सरकार आणि भाजपचे ‘ऊर्जा’वान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कार्यकारिणी निश्चित करण्यात नऊ महिने लागले. तब्बल बाराशे सदस्यांच्या जम्बो टीम राहील.नवीन कार्यकारिणी आज, बुधवारी जाहीर करणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. टीम तयार करण्यास त्यांना ९ महिने लागले आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तितकाच काळ आहे.

राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम राहणार आहे. दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय, फडणवीसांची सावध प्रतिक्रिया, मोठी घोषणाही केली!
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक जाहीर केले जाणार आहे. नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्याअखेरपर्यंत सज्ज होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही त्यांनी केला.

गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा रद्द; एनसीआयच्या लोकार्पणासाठी येणार होते नागपुरात
चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे केव्हा भूईसपाट होतील, कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.

तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर देताच त्यांचा अवमानकारक उल्लेख केला जातो. संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here