बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये एसी लावला जाणार नाही, असा मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातही चर्चेला तोंड फुटलं आहे.क्लास वन अधिकारी म्हटलं की सरकारी यंत्रणेतील संपूर्ण सुख सुविधा उपभोगणं ओघाने आलंच. अनेक विद्यार्थ्यांचं मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न असतं. सरकारी गाडी, एक मोठं एसी केबिन, यासारख्या आशा आकांक्षा अनेक होतकरु बोलूनही दाखवतात. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं एक वेगळं समाधान सरकारी नोकरी मिळव अनेक जणांच्या मनात असतं. मात्र बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ याला अपवाद ठरत आहेत.

बीड जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी स्वतःच्या केबिनपासून सुरु केला. तो निर्णय म्हणजे केबिनमध्ये कसल्याही पद्धतीने एसीची हवा येता कामा नये. त्यांच्या केबिनमधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्यात. त्यानंतर व्हीआयपी गाडीलाही एसी नसावा, त्या गाडीच्या काचाही उघड्याच असाव्यात

त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यास दीपा मुधोळकर यांनी सांगितले आहे. फक्त फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असा त्यांचा आदेश असल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यालयातील कुठल्याच विभागात वातानुकूलन यंत्रणा सुरु नाही.

याचं नेमकं कारण काय?

“माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटलं पाहिजे. बाहेरुन घामाघूम होऊन आलेली व्यक्ती एकदम एसीत आल्यानंतर थंड हवा सहन करू शकत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी यंत्रणेतील लोकांना एसीची हवा कशासाठी हवी? जितकी सरकारी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागांमध्ये अनेक झाडं लावली आहेत. त्यांची मोकळी हवा ही कार्यालयाला पुरेशी असते, याचा आस्वाद घेणं सोडलं, तर एसीची हवा लागेलच कशाला? असा मोठा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

या अनोख्या निर्णयानंतर अधिकारी देखील भांबावून गेले. मात्र आता अधिकारी खिडकीतून येणाऱ्या आणि फॅनद्वारे खेळत्या राहणाऱ्या हवेतच जिल्ह्याचे काम चालताना पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं तंतोतत पालन होताना दिसत आहे.

आतापर्यंतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचे दरवाजे आणि खिडक्या नेहमीच बंद असायच्या, मात्र त्या आज प्रत्येकाला खुल्या पाहायला मिळतात. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी खूप वेळ वाट देखील पहावी लागत नाही, कारण बाहेर कोण आलंय हे तात्काळ लक्षात येतं, जास्त प्रोटोकॉल न पाळता जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या जिल्ह्यातील त्या पहिल्या जिल्हाधिकारी मानल्या जात आहेत.

जिल्ह्यात फिरत असताना नॉन एसी कार, प्रत्येक वेळेस गाडीच्या काचाही खुल्या असतात, यामुळे नेमक्या जिल्हाधिकारी कशा दिसतात, हेदेखील सर्वसामान्यांना पाहायला मिळतं. यामुळे एक वेगळाच विश्वास आणि आदर जनमानसात वाढला आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क लाल परीमधून आपल्या कुटुंबासोबत प्रवास केल्याने जिल्हाधिकाऱ्यांविषयी आपुलकी वाढली आहे.

काँग्रेसच्या एकमेव खासदाराविरोधात स्वपक्षीयांची भाजपशी आघाडी, धानोरकरांच्या पॅनलला भोपळा
अनेक अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, शेतकऱ्यांशी संवाद साधतात, पाच ते दहा मिनिटांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा आपल्या एसी कारमध्ये बसून आपल्या एसी केबिनपर्यंत पोहोचतात, मात्र जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीड जिल्ह्यात आल्यापासून अनेक वेळा जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रश्नांवर स्वतः वेळ देऊन त्या प्रश्नांवर कशा पद्धतीने काम करता येईल आणि तो प्रश्न सोडवता येईल याकडे लक्ष केंद्रित केल्याने अनेक प्रश्न देखील जिल्ह्यात सुटत असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी नेत्याचा प्रयोग फसला, पाथर्डीत सत्तांतर, थोरातांच्या भाचेसुनेकडून सत्ता काबीज
बीड जिल्ह्यातील पहिल्याच स्त्री जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बीडमध्ये नोंद झाली आहे. मात्र प्रत्येक कामावर आणि प्रत्येक अधिकाऱ्यांवर अचूक लक्ष देत ते काम पूर्ण करून घेण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा हातखंडा असल्याचं त्यांच्या कामातून पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here