लखनऊ : उत्तर प्रदेश (युपी) एसटीएफने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संजय राय शेरपुरियाला अलीकडेच अटक केली. संजय राय शेरपुरियाचा जन्म आसाममध्ये झाला असून त्याच्या प्रवासाची कहाणी कुठल्याची चित्रपटापेक्षा कमी नाही. वडील आसाममध्ये नोकरी करायचे आणि कुटुंबासह राहत होते. शाळेची फी भरण्यासाठीही शेरपुरियाकडे पैसे नव्हते आणि त्यासाठी तो आठवड्यातून २ दिवस कचरा गोळा करायचा. कचरा विकून त्याने आपल्या व भावंडांच्या शिक्षणासाठी पैसे जमवले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेरपुरिया गुजरातमध्ये १५ हजार ५०० रुपये प्रति महिना पगारावर सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून नोकरीला लागला. आणि काही वर्षांतच त्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उभी केली. शेरपुरियाची रिमांड मिळाल्यानंतर लखनऊ पोलिस आणि यूपी एसटीएफ अनेक मुद्द्यांवर चौकशी करतील. गुजरातमध्ये आरोपी कोणाच्या संपर्कात आला आणि त्याने कोणते काम केले?

कोण आहे दीप्ति बहल? महाविद्यालयात प्राचार्य आता १५००० कोटींच्या घोटाळा प्रकरणात Most Wanted
पहिले कर्ज ९० हजार नंतर ३४९कोटींचे
शेरपुरिया सुरुवातीपासूनच मोठी कमाई करू पाहत होता. त्याने आपल्या वेबसाइटवर लिहिले की, – शक्य तितके पैसे कमवा. सर्वप्रथम शेरपुरियाने देना बँकेकडून ७ वर्षांसाठी ९० हजारांचे कर्ज घेतले, ज्यातून त्याने फूटपाथचे काम सुरू केले. त्यानंतर भाड्याने दुकान सुरू करत घाऊक विक्रेत्याचे काम सुरू केले आणि नंतर पेट्रोलियमचा व्यवसाय केला. काही वेळातच त्याने स्वतःची कंपनी उघडली आणि कोट्यवधींचे व्यवहार करायला सुरुवात केली. काही काळाने भारतीय स्टेट बँकेचे ३४९ कोटी १२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन शेरपुरिया शांत बसला. अलीकडेच बँकेने त्याला डिफॉल्टर घोषित केले असून गुप्तचर यंत्रणा आरोपींच्या संस्था आणि कंपन्यांमध्ये परकीय निधीचाही तपास करत आहे.

१२००० कोटींच्या मालकाला मुलाने रस्त्यावर आणलं, वाचा ‘कम्प्लीट मॅन’ची इनकम्प्लीट कहाणी
ईडीची छापेमारी
ईडी आरोपीविरुद्ध FIR दाखल करू शकते, असेही मानले जात असून ईडीने दिल्ली, बनारस, लखनौ आणि गाझीपूर या चार शहरांमध्ये शेरपुरियाच्या ठिकाणांवर छापे टाकलेत. ईडीने शेरपुरियाच्या छुप्या ठिकाणांवर तासनतास छापे टाकले आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. शेरपुरियाला STF ने कानपूर येथून अटक केली असून विभूतीखंड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. आता त्याच्या अटकेनंतर त्याचे अनेक साथीदार भूमिगत झाले आहेत, ज्यांचा शोध घेण्यासाठी लखनऊ पोलीस आणि एसटीएफची टीम प्रयत्न करत आहे.

देशातील एकमेव करोडपतींचं गाव; पण अवस्था अशी की गावतील पोर बेरोजगार, एकही नोकरी मिळेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here