KDMC Water Cut News : यंदा देशात पाऊस नेहेमीपेक्षा कमी असेल, असं असा अंदाज काही खासगी संस्थांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. तर शहरांना पाणी पुरविणाऱ्या धरणांमधील जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. मुंबई शहरासहित महामुंबई परिसरातील सर्वच शहरे वाढत्या पाणी टंचाईला सामोरी जात आहेत. आता कल्याण-डोंबिवलीचाही त्यात समावेश झाला आहे.

पवासाच्या अंदाज पाहता साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन असते. त्यामुळे१५ जुलै पर्यंत धरणातील पाणी साठा पुरेल अशा पद्धतीने लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा वितरणाचे नियोजन करण्यात येते. बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जुलैपर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा असल्याने नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागला नव्हता. मात्र यंदा मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी करिता ३२ टक्के तूट येत आहे. सदरची तूट भरुन काढण्यासाठी ठाणे लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तास (सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली व टिटवाळा), डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.