मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी त्याची हत्या केली. त्यानंतर वडिलांनी मुलानं आत्महत्या केल्याचा बनाव रचला. आरोपी वडिलांनी पोलिसांनी अटक केली आहे.

मयत आदित्य आढावने आई वडिलांशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान आई वडिलांना मारहाणीत झाले. यानंतर आरोपी गजानन आढाव यांनी त्यांची संगीताबाई आढाव यांना घराबाहेर पाठवले. त्यानंतर घरात बाप मुलाचे जोरदार भांडणे झाले. संतापलेल्या वडिलांनी मुलाचा गळा आवळला. थोड्या वेळाने ते भानावर आले. मुलाच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांची पाचावर धारण बसली. स्वतः ला वाचवण्यासाठी त्यांनी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी गजाजन आढाव यांची चौकशी केली. आपणच आदित्यचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर मयताची आई संगिताबाई आढाव यांच्या तक्रारीवरुन वडील गजानन आढाव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.