छत्रपती संभाजीनगर : सर्वांनी मिळून अजित दादांना व्हिलन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ते चुकीचं आहे. त्या माणसाने जे काही केलं ते राष्ट्रवादीच्या हितासाठी केलं. मी पक्षाचा प्रवक्ता नाही. माझा त्यांच्याशी संबंध नाही. परंतु, एखादा माणूस राजकारणामध्ये उंचीवर जात असेल तर या प्रकारे घाणेरडं राजकारण करून त्याला संपायचा प्रयत्न करू नये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आमचे वैचारिक मतभेद लाख असू द्या,परंतु माणूस म्हणून अजित पवार चांगले आहेत. विरोधी बाकांवर बसलेल्याला चांगलं म्हणण्याची मानसिकता आणि ताकद असली पाहिजे, हे संजय राऊतला जाऊन सांगा, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट हे छत्रपती संभाजी नगरमध्ये आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यामध्ये सुरू असलेली राजकीय परिस्थिती, शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि त्यामुळे अजित पवार यांना याचा परिणाम होत आहे का? याबाबत संजय शिरसाट बोलले. अजित पवार यांची भूमिका वेगळीच असणार आहे. कारण की यांनी सर्वांनी मिळून अजित दादांना व्हिलन बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ते चुकीचं आहे. त्या माणसाने जे काही केलं ते राष्ट्रवादीच्या हितासाठी केलं. मी पक्षाचा प्रवक्ता नाही. माझा त्यांच्याशी संबंध नाही. परंतु एखादा माणूस राजकारणामध्ये उंचीवर जात असेल तर या प्रकारे घाणेरडे राजकारण करून त्याला संपायचा प्रयत्न करू नये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आमचे वैचारिक मतभेद लाख असू द्या, परंतु माणूस म्हणून अजित पवार चांगले आहे. मी मान्य करतो ही मानसिकता आणि ताकद असली पाहिजे, हे संजय राऊतला जाऊन सांगा, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा? रोहित पवारांनी बैठकीत काय झालं ते सर्वांना सांगितलं
अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांभाळत होते. सरपंचाला देत होते. मात्र आम्हाला देत नव्हते, ते त्यांच्या पक्षाला सांभाळत होते म्हणून मी त्यांना दोष देत नाही. हे ते त्यांच्या पक्षाचं चांगलं काम केलं. मी त्यांच्याकडे निधी मागायला गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या पक्षाचे नाही. आघाडीचं सरकार असलं तरी तुमच्या पक्षाध्यक्षांना विचारा, मात्र उद्धव ठाकरेंकडे जाणं म्हणजे सात समुद्र पार करून जाणं अशी परिस्थिती होती, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

शरद पवार भूमिकेवर ठाम, तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार का? जयंत पाटील स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राज्यामध्ये सुरू असलेला ड्रामा पाहता महाविकास आघाडी आता राहिली नाही. ती संपूर्णपणे संपली आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. यामुळेच रणभूमीमध्ये नेमकं काय चाललंय? हे त्यांना दिसत नाही. संजय राऊत त्यांना काही खरी परिस्थिती सांगत नाही. शरद पवार जेव्हा म्हणतात महाविकास आघाडी टिकेल तेव्हा शरद पवार यांचं वक्तव्य म्हणजे त्याच्या विपरीत परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे महाविकास आघाडी नक्कीच तुटणार हे शरद पवार यांच्या वाक्यातून दिसून येतंय, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

रिफायनरी प्रकल्पावरून माझी दिशाभूल केली गेली, असं सांगितलं जात असेल तर हे त्यावेळेसच त्यांच्या लक्षात का आलं नाही? प्रकल्पावरून तुमची दिशाभूल केली, असं म्हणत असाल तर संजय राऊत हे तुमची रोज दिशाभूल करतात ते तुम्हाला दिसत नाही का? असा सवालही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here