‘टाइम्स नाउ’ या संदर्भातील वृत्त दिलं आहे. जून महिन्याच्या १४ तारखेला सुशांतनं मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला जवळपास दोन महिने उलटल्यानंतरही त्यावरून चर्चा, वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्यातील विरोधी पक्षाने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्याने व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव यात अप्रत्यक्षरित्या घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. शिवसेनेनेही तातडीनं पुढं येत सर्व आरोप फेटाळले आहेत.
वाचा:
शिवसेनेवरील आरोप फेटाळताना संजय राऊत यांनी अलीकडेच शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सुशांतच्या वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळं सुशांत नाराज होता. वडिलांचं दुसरं लग्न मान्य नसल्यामुळं त्यांच्यात तणाव होता, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर, अंकितानं सुशांतशी मैत्री का तोडली होती याचा तपास व्हायला हवा. या दुर्दैवी घटनेकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, अशी मागणीही राऊत यांनी केली होती.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळं आमच्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू यानं केला आहे. या प्रकरणी त्यानं राऊतांना नोटीसही पाठवली आहे. ‘वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ४८ तासांत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा इशारा बबलू यानं दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.