नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा ५०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवला गेला. या सामन्यासाठी दोन्ही संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भिडताना दिसले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने १८१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने सगळ्यांनाच शानदार खेळी करत चकित केले. दिल्लीकडून फिल सॉल्टच्या ८७ धावांच्या झंझावाती खेळीसमोर आरसीबीची ही धावसंख्या कमीच भासली. दिल्लीने अवघ्या १६.४ षटकांत १८७ धावा करून सामना जिंकला.सामना संपल्यानंतर आरसीबी आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. हे दृश्य पाहणारे सगळेच नक्कीच चकित झाले असतील. विराट आणि गांगुलीचे चाहतेही हे पाहून अवाक झाले. सामना संपल्यानंतर सगळे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करण्यासाठी आमनेसामने आले. त्यात विराट कोहली आणि गांगुलीसुद्धा होते. पण ते जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा जे दृश्य घडले ते वेगळेच होते.

खरं तर, यादरम्यान विराट कोहली आणि सौरव गांगुली एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटताना दिसले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मोसमात प्रथमच जेव्हा दिल्ली आणि आरसीबी संघ आमनेसामने आले तेव्हा विराट कोहलीने त्या सामन्यात सौरव गांगुलीशी हस्तांदोलन केले नाही. तेव्हापासून या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसले असल्याची बातमी आगीसारखी पसरली, जिथे तिथे चर्चांना उधाण आले होते; इतकेच नव्हे तर त्यांच्यातील जुन्या मतभेदांवरही भाष्य करण्यात आले होते. दोघेही या सामन्यात एकमेकांना ज्यापद्धतीने भेटले ते चाहत्यांना देखील खूप आवडते.

Sourav Ganguly Virat Kohli.

विराट आणि सौरव गांगुली यांच्यातील संघर्षाच्या बातम्या काही नवीन नाहीत. सौरव गांगुली जेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते, तेव्हा हे प्रकरण सुरू होते की त्यांचे कोहलीशी मतभेद आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणावर दोघेही उघडपणे काहीही बोलले नाहीत.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

सौरव गांगुली हे दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक आहेत. दिल्लीच्या प्रत्येक सामन्यात ते डगआऊटमध्ये दिसतात. मात्र, या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. या मोसमात, दिल्ली संघाने १० पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते सातत्याने शेवटच्या स्थानावर होते. मात्र, आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीने एका स्थानची झेप घेतली असून ती आता ९व्या स्थानावर पोहोचली आहे. असे असूनही, संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. पण गेल्या तीन सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने जे कमबॅक केले आहे ते पाहून सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here