लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी धक्कादायक मार्ग निवडला. या व्यक्तीने आपल्या मुलाच्या खुनाचा बदला कसा घेतला हे जाणून तु्म्हीही सुन्न व्हाल. या व्यक्तीने प्रथम एका वकिलाची मदत घेऊन आपल्या मुलाच्या खुन्याला जामिनावर तुरुंगातून सोडवलं. त्यानंतर त्याला मारून टाकलं. ज्याने या व्यक्तीच्या मुलाची हत्या केली ती व्यक्ती जवळचीच नातेवाईक होती.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मितौली भागात राहणाऱ्या एका ५० वर्षीय शेतकऱ्याच्या १४ वर्षीय मुलाची हत्या त्याची पत्नी आणि एका जवळच्या नातेवाईकाने मिळून केली होती. काशी असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या मृत मुलाचे नाव जिंतेंद्र असे आहे. तर काशी याच्या पत्नीने ज्या नातेवाईकाच्या मदतीने मुलाचा खून केला त्याचे नाव शत्रुघ्न लाला असे आहे.

हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा, तलवारही काढली बाहेर
शुक्रवारी रात्री ४७ वर्षीय शत्रुघ्न लाला याच्या डोळ्यात तीन गोळ्या झाडून त्याची शेतकऱ्याने हत्या केली. शत्रुघ्न जागीच ठार झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीच्या पत्नीने २०२१ मध्ये लालाच्या मदतीने आपला मुलगा जितेंद्र यांची हत्या केली होती. जिंतेंद्र याने आपली आणि आणि शत्रुघ्न लाला याला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. त्यावेळी शेतकरी काशी हा एका प्रकरणात तुरुंगात होता.

Financial Fraud: मोदींसाठी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक, १.५९ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
मुलाच्या हत्येनंतर त्याची आई आणि शत्रुघ्न यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मात्र काशी याला आपल्या मुलाच्या खूनाचा बदला घ्यायचा होता. डिसेंबर २०२ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काशीने एका वकिलाकरवी लालाला जामीन मंजूर करून दिला. लालाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जामीन मिळाला होता. तेव्हा पासून काशी त्याला ठार मारण्याची संधी शोधत होता.

सराईत चोरट्याने लढवली चोरीची अजब शक्कल, पण करामत फार काळ टिकली नाही, शेवटी व्हायचे तेच झाले
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी या प्रकरणात काशीच्या विरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. काशी हा खीरीच्या तुरुंगात कैद होता. एका स्थानिक भांडणात २०२० मध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरणात तो सहआरोपी होता. सन २०२१ मध्ये त्याचा १४ वर्षीय मुलगा जितेंद्र अचानक घरातून गायब झाला होता. काही दिवसांनंतर त्याचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. जितेंद्रचा मृत्यू नदीत बुडून झाला असं पोलिसांना वाटलं होतं. त्यामुळे तेव्हा कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here