जालना : जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील भिका नाना मरकड यांची परिस्थीती नाजूक होती. गावात सर्व परिचित असलेले त्यांचं सज्जन कुटूंब एक गुंठा पण जमीन नाही. रोज करायचे आणि रोज खायचे असा त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. त्यांना नितीन आणि सचिन अशी दोन मुलं, नितीन मोठा होता त्याचे लग्न ६ वर्षा पूर्वी झाले होते.त्याची पत्नी पुजा हिला मुलगा झाल्यावर घरात आनंदाचे वातावरण झाले होते.पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. लग्न झाल्यानंतर फक्त १ वर्ष पूर्ण झाल्यावर नितीन यांना किडणीचा आजार लागला.किडनीचा आजार झाल्यानंतर नितीनला गावातील सर्वांनी सहकार्य व प्रयत्न करुन देखील नितीनचे त्या आजारात निधन झाले. पुजासह साऱ्या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. वडिलांची तोंडओळख झालेला जयराज वडिलांना पोरका झाला.या घटनेला जवळपास ६ वर्ष झाली आहेत.

पतीचे निधन झालेल्या पुजाचे सध्याचे वय २४ वर्ष आणि मुलगा जयराज याचे अवघे साडे पाच वर्ष आहे.याचे दु:ख गावातील सर्वांनाही होते.नितीन तर गेला आता पुजाचे काय होईल? जयराज चे कसे होईल? असे अनेक प्रश्न परिवारा सह गावकऱ्यांना पडले होते.सुनेचे वय फार कमी असल्याने तिचे होते पुढे कसे होईल, याची चिंता असल्यानं सासू सास-याला घास गोड लागू देत नव्हती.सर्वांना वाटायचे पुजाचे लग्न दिर सचिन सोबत करुन द्यावे.सचिनला देखील जमीन नाही,पक्के घर नाही त्याचे लग्न जमण्यासाठी देखील अनेक समस्या होत्याच.पण अशा फक्त चर्चाच गेल्या ५ वर्षांपासून चालू होत्या.या विषयाचा कायमचा तुकडा पडावा लागेल या साठी त्यांच्या परिवारातील समजूतदार,सुशिक्षित लोकांनी एकदा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न काही कारणाने लांबणीवर पडला होता.
सूर्यानं आरसीबीची धुलाई केली, तो आऊट होताच विराटच्या कृतीनं सर्वांची मनं जिंकली, मुंबई इंडियन्सचं अनोखं ट्विट

जालन्यात फुलवली सफरचंदाची बाग, अर्ध्या एकरात मिळणार २ लाखांचं उत्पन्न, बळीराजाला विश्वास

अखेर गेल्या ८ दिवसात या विषयाचा तुकडा पडलाच पाहिजे या उद्देशाने परिवारातील सदस्यांनी ठाम निश्चय केला आणि भावकीतील प्रत्येकाकडे जाऊन त्यांना सचिन आणि पुजाच्या लग्ना विषयी चर्चा केली. सुशिक्षित मुलांनी घेतलेल्या या निर्णयाला परिवारातील सर्व आजोबा,चुलते,सर्व चुलत्या,सर्व चुलत भाऊ यांनी क्षणाचा ही विलंब न करता या विचाराला होकार दिला आणि सगळ्या परिवारातील सदस्यांनी हातावर साखर देत या ठरावाला मान्यता दिली. दोन दिवसांपूर्वी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर जालना शहराजवळील माळाच्या गणपती मंदिरा दोघांचे लग्न पार पडले.परिवारातील सुशिक्षित नव्या दमाच्या युवकांनी पुढाकार घेतल्याने किती तरी प्रश्नांची उत्तर या कार्याने मिळाली.या लग्नासाठी परिवारातील उद्धवदादा मरकड, किशोर आबा मरकड, रणवीर भैया मरकड, डॉ.गांडगे सर यांनी प्रयत्न करत पुढाकार घेतला आणि पूजा यांना पतीचा तर छोट्या जयराजला वडिलांचे छत्र पुन्हा मिळाले.

सूर्यासाठी विराटने रचलेला सापळा पण दादाने RCB ला फसवलं, पाहा नेहलसोबत कसं केलं विजयाचं प्लॅनिंग?

परिवारातील सदस्य आणि गावकऱ्यांच्या एकीमुळे एक विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसल्याने या निर्णयाचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था टाईम बॉम्बवर उभी, रघुराम राजनना सतावतेय ही भीती, कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here