म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी हे शंभर टक्के भरले आहे. या धरणातून मुठा नदीपात्रात ४२८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला धरण हे मंगळवारी सुमारे ९८ टक्के भरले होते. त्यानंतर रात्रभर झालेल्या संततधारेमुळे हे धरण सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मुठा नदीपात्रातून ४२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

वाचाः

खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये १.९७ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी टेमघर धरणात १.७० टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.५१ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांमध्ये १८.८० टीएमसी पाणीसाठा झाला असून, ही धरणे सुमारे ६५ टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वाचाः

नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाणी सोडल्यानंतर भिडे पूल पाण्याखाली जातो. सध्या विसर्गाचे प्रमाण कमी असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना धोका नसल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here