अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल आज जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होणार असल्यानं राज्यातील राजकीय घडामोडी देखील वाढल्या आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते सत्तासंघर्षाबद्दल आपलं मत मांडत आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वातील घटनापीठ निकाल जाहीर करणार आहे. राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं असताना राज्यातील शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचं चित्र आहे. राज्यातील सत्तासंघर्ष आणि राजकीय नेत्यांची भूमिका यासंदर्भात स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील जी काही स्थिती आहे ती बरोबर नाही. लोकांच्या विकासाचं बोलण्याऐवजी माझं तुझं सुरु आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते नांदेडमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

नांदेड दौऱ्यावर असताना संभाजीराजे यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य केलं. राजकीय स्थितीवर वेगळ्या विचारपीठावरुन बोलणार आहे. राज्यात जी काही स्थिती आहे ती बरोबर नाही. राजकारण खालच्या पातळीवर पोहोचलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांच्या विकासाची भाषा बोलण्यापेक्षा माझं तुझं सुरु आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ; संजय राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं
शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालं पण आमदार खासदार पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा देखील झालेला नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लाँग टर्म योजना तयार केली पाहिजे. शेतकऱ्यांकडे आमदार गेलेला नाही, खासदार गेलेला नाही, सरकारी अधिकारी गेलेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Jayant Patil ED Notice : मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती राज्याच्या दौऱ्यावर

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकारण करणार असल्याचं म्हटलं. संभाजीराजे छत्रपती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं ते तिथल्या जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. नांदेडमध्ये आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालाला अवघे काही तास, शिंदे गटातील तो मंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; खैरेंचा खळबळजनक दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here