यांच्या आत्महत्येच्या संदर्भात विरोधकांच्या सुरात सूर मिसळत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसं निवेदन त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. त्यामुळं आधीपासूनच ही मागणी करणाऱ्या विरोधकांना बळ आलं होतं आणि सरकारची गोची झाली होती. त्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या संदर्भातही पार्थ यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडली होती. त्यातूनही चर्चेला उधाण आलं होतं. या सगळ्या घडामोडींवर बोलताना शरद पवार यांनी बुधवारी पार्थ यांना जाहीररित्या फटकारलं. पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,’ असं पवार म्हणाले होते. त्यातून पवार कुटुंबातील मतभेदांच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांच्या वक्तव्यावर थेट काही बोलणं टाळलं. ‘आजोबा आणि नातवातला जो काही वाद, विवाद, संवाद आहे. त्यात आम्ही का बोलायचं? तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, असं फडणवीस म्हणाले. ‘आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे आणि नातवानं आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवानं ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही,’ असा चिमटाही त्यांनी काढला. मात्र, सुशांतसिंहच्या प्रकरणात सीबीआय चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही हे पवारांनी स्पष्ट केलंय एवढं मात्र खरं, हेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thank you ever so for you article post.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.