मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सु्प्रीम कोर्टाच्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. तो बहुप्रतिक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असं सगळ्यात मोठं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उद्याच या चौकशीला त्यांना हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान, पाटलांनी पाच तासांनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वत:चं स्थान टिकवता आलं नाही, आता तुम्ही आमची मापं काढणार?; जयंत पाटलांकडून फडणवीसांचा समाचार

“काल माझा लग्नाचा वाढदिवस होता. त्यात ईडीने मला नोटीस पाठवली, संध्याकाळी ५ वाजता सही झाली आणि ६ वाजता नोटीस माझ्या घरी आली. पण त्या नोटिशीमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्यातल्या काही फाईल नंबर काढून बघितल्या तर, असं दिसतंय की आयएलएफएस नावाची कुठली संस्था आहे आणि त्याच्याशी माझा आयुष्यात काही संबध आला नाही. कधी आयएलएफएसचं कर्ज घेतलं नाही, त्यांच्या दारात मी कधी गेलो नाही. कधी कुणाशी बोललो नाही. त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तरी आता बोलावलंय म्हटल्यावर कालच एका हवालदाराने ६ वाजता माझ्याकडे येऊन ही नोटीस मला दिली. आता त्यांची जी काही चौकशी असेल, त्याला सामोरे जाऊ. पण आता दोन ते तीन दिवस लग्नसराई आहे. घरातल्या जवळच्यांची लग्न पण आहेत. त्यामुळे ईडीकडे वेळ मागणारं पत्र मी आज पाठवून देईन”, असंही जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

“जयंत पाटलांना आजच्या सत्तासंघर्षाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ही नोटीस आली आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, “ईडीची नोटीस कशासाठी आहे ते भारतात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना जी सोयीची तारीख अथवा वेळ वाटते त्यावेळी ते तशी नोटीस देणार, त्याला काही इलाज नाही. त्यामुळे जी नोटीस आहे, त्याला उत्तर देणं, त्याला सामोरं जाणं, हे आम्ही करु. कारण माझं सगळं राजकीय आयुष्य हे खुली किताब आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही, कुणाशी काही चुकीचे व्यवहार करण्याचा तसेच घोटाळा करण्याचा कार्यक्रम मी कधी केलेला नाही. त्यामुळे मला खात्री आहे. त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती मी देईनच. पण कोणत्याही स्वरुपात मनी लाँन्ड्रिंग प्रकारच्या कोणत्याही गोष्टी मी कधीच केलेल्या नाहीत. त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावलेंची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here