कोलकाता : राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ९ विकेटसनी विजय मिळवला. राजस्थानच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. यशस्वी जैस्वालनं ४७ बॉलमध्ये ९८ धावांची विक्रमी खेळी केली. यशस्वी जैस्वालनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. यशस्वी जैस्वालनं के.एल. राहुल आणि पॅट कमिन्स यांचा विक्रम मोडला. मात्र, युवराज सिंग आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची संधी हुकली.

यशस्वी जैस्वालचं आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक

यशस्वी जैस्वालनं आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आपल्या नावावर नोंदवलं आहे. यशस्वी जैस्वालनं केकेआरचा कप्तान नितीश राणा याला पहिल्याचं ओव्हरमध्ये २६ धावा काढल्या. पुढच्या ७ बॉलमध्ये एक सिक्स आणि तीन चौकार याच्या मदतीनं २४ धावा काढल्या आणि १३ बॉलमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. यासह यशस्वी जैस्वालनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्यानं केला आहे. त्या १३ बॉलमध्ये यशस्वीनं ६,६,४,४,२,४,१,४,६,४,४,४,१ अशा प्रकारे ५० धावा पूर्ण केल्या.

जॉस बटलरवर KKR विरुद्धच्या सामन्यानंतर मोठी कारवाई, ही एक चूक पडली भारी

यशस्वी जैस्वालनं नितीश राणाला पहिल्या ओव्हरमध्ये २६ धावा काढल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाला एकूण ११ धावा काढल्या त्यातील अखेरच्या दोन बॉलमध्ये १० धावा काढल्या. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरला सलग तीन चौकार लगावले. त्यानंतर एक रन घेत त्यानं ५० धावा पूर्ण केल्या.

Uddhav Thackeray: आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

युवराज सिंग आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची संधी हुकली

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल आणि हजरतुल्लाह जजई यांच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. युवराज सिंगनं २००७ मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरोधात १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या. तर, ख्रिस गेलनं २०१६ मध्ये मेलबर्न रेनेगेडस कडून खेळताना अॅडिलेड स्ट्राईकर्स विरुद्ध १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या. हजरतुल्लाह जजई यानं काबुल जवानन कडून खेळताना बल्क लिजंडस विरुद्ध २०१८ मध्ये १२ बॉलमध्ये ५० धावा केल्या होत्या.
Weather Update: मराठवाडा, विदर्भ, मुंबई-पुण्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here