देशात अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. पण दक्षिणेत मात्र भाजपचा हा विजय रथ येऊन थांबतो. कर्नाटक असे राज्य होते जे जिंकून भाजप अधिक शक्तीने तेलंगण निवडणुकीच्या मैदानात उतरली असती. तेलंगणमध्ये यावेळी सामना केसीआर यांच्या बीआरएसशी आहे. पण कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाल्याने भाजपच्या पुढील वाटचालीला मोठा झटका बसला आहे. या वर्षी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकमधील पराभवानंतर काँग्रेसला भाजवर निशाणा साधल्याची संधी मिळाली आहे.
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने दिला तेलंगणचा संदेश
तेलंगणमध्ये या वर्षी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बीआरएस आणि भाजपमध्ये थेट सामना होणार आहे. पण कर्नाटक निवडणुकीतील विजयाने काँग्रेसला बळ मिळालं आहे. तेलंगण निवडणुकीपूर्वी पक्षात उत्साह संचारल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. कर्नाटक निवडणुकीत प्रचार संपला त्याच दिवशी प्रियंका गांधी यांनी तेलंगणमध्ये संध्याकाळी सभा घेतली होती. यावेळी प्रियंका गांधी यांनी केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजपसाठी मिशन साउथ बनले अवघड
दक्षिणेतील राज्यात लोकसभेच्या १२९ जागा आहेत. यापैकी भाजपकडे फक्त २९ जागा आहे. या २९ जागांपैकी २५ जागा या फक्त एकट्या कर्नाटकमधल्या आहेत. आणि या कर्नाटमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. भाजप दक्षिणेतील लोकसभेच्या १२९ जागांवर लक्ष केंद्री केले आहे. दक्षिणेत फक्त कर्नाटक आणि तेलंगणवर भाजपचं लक्ष नाहीए तर दुसऱ्या राज्यांबाबतही भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यास दक्षिणेत कमळ फुलवण्यासाठी भाजपला अनुकल वातावरण आहे, असा संकेत मिळेल, असं मानलं जात होता. पण कर्नाटकमध्ये पराभवाचा सामना करावा लागत आसल्याने भाजपला ठेच बसली आहे. कर्नाटकनंतर आता दक्षिणेत दुसरं राज्य तेलंगण आहे. आता तेलंगण निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर खूप काही अवलंबून असेल.