पुणे : अमरावतीच्या एका तरुणाची शुक्रवारी हत्या करण्यात आली. या अमरावतीच्या आयटी इंजिनिअरच्या हत्येचा लोणी कंद पोलिसांनी छडा लावला आहे. या तरुणाने देय तीन हजार रुपये वेळेत न दिल्याने कॅबचालकानेच तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी कॅब चालकास अटक केली आहे.

भगवान केंद्रे (वय २३, रा. ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार फरार आहे. गौरव सुरेश उदासी (वय ३५, रा. अमरावती) असे हत्या झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. तो एका आयटी कंपनीत नोकरीस होता. खराडी भागातील एका सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही.

Jayant Patil: जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, ‘या’ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हार डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकी क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेऊन गौरवची ओळख पटविली होती. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात गौरवचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली.

कॅब बुकिंगुळे झालेली ओळख

आरोपी भगवान पुण्यात एका ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीसाठी कॅब सेवा देत होता. गौरवने यापूर्वी ॲपवरून दोन वेळा प्रवासासाठी गाडीचे बुकिंग केले होते. त्यावेळी भगवानचीच कार वापरण्यात आली होती. त्यामुळे गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. तसेच, त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांकही घेतले होते.

वादावादीनंतर केले मानेवर वार

गौरव भगवानला कॅबचे तीन हजार रुपये भाडे देणे लागत होता. गौरवने वेळेवर पैसे दिले नाहीत. त्यामुळे भगवान त्याच्यावर चिडला होता. भगवानने शुक्रवारी रात्री गौरवला बोलावून घेतले. भगवान, त्याचा साथीदार आणि गौरव कारमधून मल्हार डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे वादावादीनंतर त्याची हत्या करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं, मुंबई महापालिका निवडणूक कधी? सेना नेत्याकडून मोठी अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here