म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची केलेली निवड योग्यच आहे. येत्या काळात आदित्य उत्तम भविष्य असून, त्यांच्यात स्पार्क आहे. त्यांची निवड योग्यच असून विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही, असे स्पष्ट मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी मांडले.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवड करण्यात आली. या निवडीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टिकेवर सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सामंत म्हणाले की, टिका करण्यासाठी विरोधकांकडे भरपूर वेळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आघाडी सरकारवर टिका करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. मात्र, त्यांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असलेल्या समितीत माझा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे क्षमता असून ते अतिशय चांगल्या पध्दतीने काम करु शकतात, असेही सामंत यांनी सांगितले .

ठाकरे कुटुंबीयांना राज्य नाही, तर संपूर्ण देश ओळखतो

एखाद्या प्रकरणात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्याला जनता प्रत्युत्तर देईल. ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. काही लोकांकडून स्वतःच अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे. यामुळे सरकारविरोधात टिका करण्याचे काम सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here