केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवड करण्यात आली. या निवडीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टिकेवर सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सामंत म्हणाले की, टिका करण्यासाठी विरोधकांकडे भरपूर वेळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आघाडी सरकारवर टिका करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. मात्र, त्यांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असलेल्या समितीत माझा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे क्षमता असून ते अतिशय चांगल्या पध्दतीने काम करु शकतात, असेही सामंत यांनी सांगितले .
ठाकरे कुटुंबीयांना राज्य नाही, तर संपूर्ण देश ओळखतो
एखाद्या प्रकरणात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्याला जनता प्रत्युत्तर देईल. ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. काही लोकांकडून स्वतःच अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे. यामुळे सरकारविरोधात टिका करण्याचे काम सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.