नागपूर : यंदा देशात एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेने मोठा तडाखा दिला. जगभरातील हवामान बदलाची चिंता हवामान शास्त्रज्ञांना सतावत असून शास्त्रज्ञांनी या हवामान बदलाचा सूक्ष्मपणे अभ्यास सुरू केला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाअंती असे आढळले हे की मानवामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे भारतात एप्रिलमधील विक्रमी दमट उष्णतेची लाट येण्याची शक्यता किमान ३० पट अधिक आहे. इतकेच नाही तर अशा उष्णतेच्या लाटेच्या घटना पाच वर्षांतून एकदा देशात घडणे अपेक्षित आहे, असे एका ताज्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.जगभरातील तापमानवाढीचा अभ्यास करणाऱ्या हवामान शास्त्रज्ञांनी एकूण ४ देशांचा अभ्यास केला. या देशांमध्ये भारतासह बांगलादेश, थायलंड आणि लाओस या देशांचा समावेश होता. या देशांमध्ये एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी तपामान वाढीचा विक्रम मोडला गेल्याचे या शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. तसेच या ठिकाणी जीवितहानीच्या घटनांची देखील नोंद झाल्याचे त्यांना आढळले.
Tulja Bhavani: तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जारी; ड्रेसकोड लागू
एप्रिल महिन्यातील काही दिवसांमध्ये शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करण्यासाठी सरासरी सर्वाधिक तापमान आणि उच्चतम उष्णता निर्देशांकाची तपासणी केली. यासाठी शास्त्रज्ञांनी दक्षिण आणि पूर्व भारतासह बांगलादेश, थायलंड आणि लाओसमधील काही ठिकाणांची निवड केली. तापमान आणि हवेतील आर्द्रता यांचा मानवी शरीरावर काय परिमाम होतो हे नेमकेपणाने मोजण्याचे परीमाण म्हणजे हा उष्णता निर्देशांक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे.

या पाहणीत शास्त्रज्ञांना असे आढळले की तापमानवाढीत २ सेल्सियसने वाढ होऊन दमट उष्णतेच्या लाटेत ३० पटीने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Breaking: मध्यान्ह भोजन योजनेत ६७ कोटी ५३ लाखांचा महाघोटाळा उघड, २७ हजार कामगार बोगस निघाले
शास्त्रज्ञांनी इशारा देताना सांगितले की, एकूण हरितगृह वायू उत्सर्जन थांबेपर्यंत, जागतिक तापमान वाढतच जाईल आणि अशा घटना अधिक वारंवार आणि गंभीर होतील.

शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा

बांगलादेश आणि भारतात, उष्णतेच्या लाटेच्या घटना सरासरी शतकात एकापेक्षा कमी वेळा घडत असत. आता मात्र ते पाच वर्षांतून एकदा अपेक्षित आहे. तापमानात वाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास, ही स्थिती सुमारे ३० वर्षांत येईल. जर उत्सर्जन वेगाने कमी केले गेले नाही, तर या घटना दर दोन वर्षांतून एकदा घडण्याचीही शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांनी आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.

सांगलीत भीषण अपघात; ट्रॅक्टरने दिली कारला धडक, एकाच कुटुंबातील ५ जण गेले, एकूण ६ मृत्युमुखी
उष्णतेच्या लाटेच्या हंगामात उद्भवलेल्या इतर धोक्यांमुळे देखील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणखी वाढला आहे. भारतात या वर्षी १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान जंगलांमध्ये एकूण १,१५६ वेळा आग लागल्याची घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here