मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली असून यासाठी २३ मे पासून नोटा जमा करणे किंवा बदलणे सुरू होईल. आणि २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही बँकेत जमा किंवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. आता पण प्रश्न असा येतो की आरबीआयला २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची गरज का पडली? क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय? याबाबत माहिती घेऊ…

RBI On Rs 2000 Rupee Note : दोन हजाराची नोट बंद, तुमच्याकडे असेल तर घाबरू नका, फक्त हे काम करा
२००० रुपयांच्या नोटा का बाद?
आरबीआय क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २००० रुपयांच्या नोटा काढून घेत आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांचे वय ४ ते ५ वर्षे असणार होते, त्यामुळे आरबीआय या नोटा मागे घेत आहे. तसेच सर्वसामान्यांमध्ये ही नोट फारशी चलनात नाही. याशिवाय उर्वरित रकमेच्या चलनी नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा २००० रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नोटेची छपाई बंद
रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला असून आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. पण केंद्रीय बँकेने २०१८-१९ पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली होती. आता क्लीन नोट धोरणांतर्गत ती मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

RBI On Rs 2000 Rupee Note : एकावेळी दोन हजाराच्या किती नोटा बदलवता येणार? रिझर्व्ह बँकेने सांगितलं…
क्लीन नोट पॉलिसी म्हणजे काय?
लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा मिळाव्यात यासाठी १९८८ मध्ये क्लीन नोट पॉलिसी आणली होती. देशातील बनावट नोटांच्या चलनाला आळा घालण्यासाठी हे धोरण आणण्यात आले.

RBI Withdraws 2000 Note: २ हजार रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय का घेतला? RBI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
क्लीन नोट पॉलिसी कशी काम करते?
आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २७ नुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारे नोटांना नष्ट किंवा छेडछाड करू शकत नाही. नोटा चलनात ठेवण्याबरोबरच त्या स्वच्छ ठेवणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, नवीन क्लीन नोट पॉलिसी १ ऑक्टोबर २०१८ पासून लागू करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here