वाचाः
कौस्तुभ हा इयत्ता नववीचा विद्यार्थी असल्याचे समजते. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आत्महत्येचे कारण लिहिलेले नाही. मात्र मी ८ वर्षांपूर्वीच मेलो असतो तर चांगले झाले असते. मला जाळू नका मला गाडा, अशी इच्छा व्यक्त करीत त्याने आपले जीवन संपविले. त्याचे वडील पेंटींगचे काम करतात तर आई बँकेत काम करते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
वाचाः
एकुलत्या एक मुलगा गमाविल्यानंतर कौस्तुभच्या पालकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट नाही. तसेच ८ वर्षापूर्वी नेमकी कोणती घटना घडली होती हेसुद्धा अद्याप स्पष्ट नसल्याने पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याखेरीज इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारा सिग्नल परिसरातील रहिवासी मनोज काशीनाथ बसेला (५३) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Thank you for publishing this awesome article.