मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु २००८ पासून आयपीएल खेळत आहे. सुरुवातीला संघात जॅक कॅलिस, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, मार्क बाउचर आणि डेल स्टेनसारखे धडाकेबाज खेळाडू होते. त्यानंतर संघात विराट कोहलीची (Virat Kohli) एन्ट्री झाली. ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारखे टी-२० चे तुफानी फलंदाज संघाचा भाग होते. आता संघात फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत. गोलंदाजीत जहीन खानपासून युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजपर्यंत मोठे खेळाडू संघाचा भाग होते. दरवर्षी आयपीएल सुरू होण्यापूर्वी आरसीबी संघ हा विजयाचा दावेदार मानला जातो. पण, जशी आयपीएल संपत येते तशी त्यांच्या विजयाची आशाही मावळत जाते.आरसीबीच्या विजयाच्या मध्ये अडचण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांच्याकडे भारतीय फलंदाज नसणे. या संघात २००८ मध्ये विराट कोहलीने एन्ट्री केली. तेव्हा दिल्लीने आपला देशांतर्गत क्रिकेटपटू विराटवर विश्वास दाखवला नाही. आरसीबीने विराचला घेतलं आणि आजही तो संघासोबत आहे. पण, विराट व्यतिरिक्त, आरसीबीकडे आजवर असा एकही भारतीय फलंदाज नाही जो अनेक वर्षांपासून संघासोबत राहिला असेल आणि ज्याने धावाही केल्या असेल.

IPL 2023: नवीन कधी सुधारणार? RCB प्ले ऑफमधून बाहेर पडताच केलं चीड आणणारं काम…
एक हजाराहून अधिक धावा फक्त विराटच्या

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजपर्यंत विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने आरसीबीसाठी आयपीएलमध्ये हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पण, विराटशिवाय दुसरं कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल सारख्या फलंदाजांनी काही काळ संघासाठी चांगली कामगिरी केली. पण, नंतर ते इतर संघात गेले.

RCB साठी IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

  • विराट कोहली – ७२६३
  • राहुल द्रविड – ८९८
  • देवदत्त पडिक्कल – ८८४
  • पार्थिव पटेल – ७३१
  • मनदीप सिंग – ५९७

Rinku Singh: रिंकूने ती एक चूक केली नसती तर KKR ने इतिहास रचला असता…
चॅम्पियन संघांची स्थिती?

मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. ७ भारतीय खेळाडूंनी संघासाठी हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. केकेआर दोन वेळा चॅम्पियन आहे आणि ९ भारतीय फलंदाजांनी त्यांच्यासाठी हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ४ वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जसाठीही ७ फलंदाजांनी हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

RCB च्या मॅचसाठी अनुष्का रवाना? मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

सध्या मुंबईत रोहित शर्माशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा आहेत. तर, चेन्नईकडे रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, जडेजा आणि शिवम दुबे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here