नवी दिल्ली : तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने जर जन-धन खाते असल्यास सावध राहा. मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २,००० रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून बाहेर करण्याची घोषणा केली. आणि आता याअंतर्गत २३ मे म्हणजे उद्यापासून बँका आणि वित्तीय संस्थेत नोटा बदलण्याची किंवा खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा स्थितीत जर तुमचे जन धन खाते आहे आणि जर २००० रुपयांच्या नोटा अशा खात्यात मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता.

ज्यांच्याकडे २,००० रुपयांच्या नोटांच्या रूपात काळा पैसा आहे, ते कोणत्याही जन धन खातेधारकाचा वापर करून त्यांच्या नोटा बदलून घेऊ शकतात, अशी भीती इन्कम टॅक्स विभागाला आहे. त्यामुळे अशा खात्यांच्या छाननीची तयारी सुरू आहे.

2000 Note Exchange Guidelines: २४ ठीक, पण २५व्या नोटेसाठी पॅन-आधार कार्ड सक्तीचं, जाणून घ्या काय आहे नियम
खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास काय?
सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार त्यांना प्राप्तिकर विभागाकडून सूचना येत असतात. त्यामुळे जन धन खात्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. आणि जन धन खात्यात ‘संशयास्पद’ व्यवहार असल्यास त्याची नोंद केली जाते. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही (AI) वापर करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. त्यांच्यानुसार काळा पैसा गोळा करणारे त्यांच्या २,००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी अशाच प्रकारचे डावपेच अवलंबू शकतात.

एक शिक्का अन् तुमची नोट रद्दी! २ हजारांच्या नोटा बदलणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
प्रामाणिक लोकांना नाही होणार त्रास
याशिवाय जर कोणाच्या घरी २००० रुपयांच्या काही नोटा पडून असतील आणि ते बँकेच्या शाखेत जमा करण्यासाठी आल्यास त्यांची चौकशी केली जाणार नाही, असेही आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले. पण जर गरीब किंवा सामान्य वर्गातील व्यक्तीने मोठ्या संख्येत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या अशा व्यक्तीची चौकशी होऊ शकते. आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी बँका, आयकर अधिकारी आणि इतर काही एजन्सीदेखील पूर्ण सतर्क आहेत.

2000 Note Withdrawal: दोन हजार रुपये चलनातून बाद, RBI गव्हर्नरांच्या महत्त्वाच्या सूचना; म्हणाले…
उल्लेखनीय आहे की मागील काही वर्षांपूर्वी समाजातील उपेक्षित लोकांना बँक नेटवर्कशी जोडण्यासाठी किंवा आर्थिक समावेशासाठी जन धन खाती उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. सध्या देशातील बहुतांश गरीब कुटुंबांकडे किमान एक जन धन खाते आहे. तर काही स्वार्थी घटकांनी अशा खातेदारांच्या खात्याचा गैरवापरही केल्याचे दिसून आले आहे. अशा संशयास्पद खात्यांवर आयकर विभाग लक्ष ठेवून असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here