मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने याने सांगितले की विराट कोहलीने आता आयपीएल फ्रँचायझी बदलण्याची गरज असून त्याने दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील व्हावे. कोहलीच्या शतकानंतरही आरसीबीचा संघ साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पराभूत झाला. करो या मरोच्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर १९८ धावांचे लक्ष्य राखण्यात संघाला अपयश आले.पीटरसनने ट्विट केले की, ‘वेळ आली आहे की विराटने राजधानीच्या फ्रेंचायझीमध्ये सामील व्हावे’. भारताचा माजी कर्णधार कोहली २००८ पासून आरसीबीसोबत आहे. प्रदीर्घ काळ संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर २०२१ मध्ये त्याने ही जबाबदारी सोडली.

IPL 2023: नवीन कधी सुधारणार? RCB प्ले ऑफमधून बाहेर पडताच केलं चीड आणणारं काम…
कोहलीने १६ व्या सीझनमध्ये दोन शतके झळकावली

आयपीएल २०२३ वैयक्तिकरित्या कोहलीसाठी उत्कृष्ट ठरले आहे. त्याने आपल्या संघासाठी १४ सामन्यांमध्ये १३९ च्या स्ट्राइक रेटने ६३९ धावा केल्या, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. गुजरातविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर कोहलीही निराश दिसत होता.

कोहलीला दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होण्याचा सल्ला पीटरसनने दिला. मात्र, भविष्यात असं होण्याची शक्यता फारचं कमी आहे. कोहलीने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत तो आयपीएल खेळत आहे तोपर्यंत तो आरसीबीसोबतच राहणार आहे.

विराट कोहलीची होम टीम दिल्ली आहे. दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून त्याने आंतरराष्ट्रीय संघात स्थान निर्माण केले. पण, जेव्हा आयपीएलच्या पहिल्या लिलावात त्याला विकत घेण्याची वेळ आली तेव्हा दिल्ली फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नाही.

RCB Playoffs: IPLची ट्रॉफी हातात येता-येता निसटून जाते, RCBचं नेमकं कुठं चुकतंय?
विराट कोहली हा आयपीएलमधील पहिला खेळाडू आहे ज्याने कोणत्याही आपल्या संघासाठी ७००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोहलीची ओळख बनवण्यात आरसीबीचाही मोठा हात आहे. अशा परिस्थितीत, तो आता इतर कोणत्याही फ्रेंचायझीमध्ये सामील होईल, याची शक्यता फार कमी आहे.

RCB चा पराभव, विरुष्का मुंबई परतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here