रत्नागिरीः तळकोकणात गेले दोन दिवस तुफान पाऊस कोसळत असून रत्नागिरी जिल्हा जलमय झाला आहे. शनिवारी समुद्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व लाटांचे तांडव सुरू असतानाही मासेमारी करण्यास गेलेल्या मच्छिमारांच्या अंगलट आलं आहे.

मच्छिमारी शुभारंभ करण्याआधी समुद्राला नारळ देऊन मासेमारी करायला गेलेली बोट बुडाली असल्याची घटना घडली आहे. बोटीवरील सहा खलाश्यांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर त्यातील दोन बेपत्ता होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून एकाचा अद्याप शोध घेण्यात येत आहे. ही घटना दापोली तालुक्यात केळशीच्या समुद्रात घडली.

बोट मालक मकबुलशेख अली चाऊस यांची असून माशाल्ला नावाची यांत्रिक बोट असून लाटांच्या तडाख्यानं पलटी झाली होती. समुद्रातील अन्य बोटींनी त्या चार जणांना वाचवले. शाहदत बोरकर याचा मृतदेह मिळाला असून गणीखमसे यांचा अजून शोध सुरू आहे.

दरम्यान, पावसाचे थैमान सूरूच असून चिपळून संगमेश्वर माखजनमध्ये पूरस्थिती असून तेथील बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत.महामार्गावरील वाशिष्ठिपुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. कोयना धरणातुन झालेला पाण्याचा विसर्ग व काल रात्रीपासुन दिवसभर कोसळणारा पाऊस यामुळे वाशिष्टी नदीचे पाणी शहरात घुसले, शहरातील सर्वच भागात पाणी शिरल्याने व्यापारांचे व शहरवासीयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संगमेश्वरच्या गड नदीला पुर आल्याने माखजन बाजारपेठेत पाणि भरले आहे. रात्रीपासूनच पाण्याचा जोर वाढत असल्याने व्यापारी व नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here