पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांच्या हा कौटुंबिक प्रश्न आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांनी तो घरातच सोडवावा, असं म्हणत गिरीश बापट यांनी पार्थ यांच्या भाजप प्रवेशाचं खंडन केलं आहे. तसंच, जय श्री राम नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, जय श्री राम काय पार्थ एकटाच थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
वाचाः
काय आहे नेमकं प्रकरण?
अयोध्येतील राम मंदिर आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत घेतल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता होती. नेते व कार्यकर्तेही संभ्रमात होते. शरद पवार यांनी बुधवारी स्वत: पुढं येऊन हा संभ्रम दूर केला. पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं स्पष्ट केलं होतं.
वाचाः
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच पार्थ पवार यांनीही कुटुंबीयांशी चर्चा केली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनीही या विषयात जाहीर भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि अन्य कुटुंबीयांची भेट घेतली होती.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.