पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव यांनी घेतलेली पक्षाशी विसंगत भूमिका व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जाहीरपणे त्यांना लगावलेली फटकार आणि त्यानंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पार्थ पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात असताना भाजपचे खासदार यांनी या चर्चांना पूर्णविराम देत ‘पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही,’ असं म्हटलं आहे.

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांच्या हा कौटुंबिक प्रश्न आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांनी तो घरातच सोडवावा, असं म्हणत गिरीश बापट यांनी पार्थ यांच्या भाजप प्रवेशाचं खंडन केलं आहे. तसंच, जय श्री राम नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, जय श्री राम काय पार्थ एकटाच थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

वाचाः

काय आहे नेमकं प्रकरण?

अयोध्येतील राम मंदिर आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत घेतल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता होती. नेते व कार्यकर्तेही संभ्रमात होते. शरद पवार यांनी बुधवारी स्वत: पुढं येऊन हा संभ्रम दूर केला. पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं स्पष्ट केलं होतं.

वाचाः

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच पार्थ पवार यांनीही कुटुंबीयांशी चर्चा केली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनीही या विषयात जाहीर भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि अन्य कुटुंबीयांची भेट घेतली होती.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here